महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई ईंडियन्स यांचा सामना सुरू आहे आणि ज्या त्या संघाचे चाहते आपला संघ कसा लढतोय याकडे लक्ष देऊन आहेत. यामध्ये एक लक्षात असू द्या की दोन्ही बाजूंनी मारलेल्या षटकाराची किंमत सहा धावाच असणार आहे.....आपल्या संघाच्या खेळाडूने खेचलेला षटकार षटकार ठरवा आणि समोरच्या प्रतिपक्षातील खेळाडूने षटकार खेचला तर त्याला बाद ठरवा असा खेळ असत नाही. आपल्याला प्रतिपक्षाने मारलेला षटकार आवडत नसला तरी तो मान्य करणे ही खरी खिलाडू वृत्ती असते. गल्लीक्रिकेटमध्ये बॕट आणि बॉल यांची मालकी एखाद्याची असू शकते पण त्याला खेळाच्या नियमांचे मालक होता येत नाही. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जात असला तरी पंचानी बाद ठरवताच निमूटपणे मैदानातून बाहेर होणे हे त्याचे कर्तव्य बनून जाते. त्याप्रमाणे कायदे, न्यायाधीश आणि निवडणूक आयोग हे नियमावर बोट ठेवूनच निर्णय देणार आहेत.आवडता निकाल खरा आणि नावडता निकाल खोटा अशी विभागणी असत नाही . हां, दिलेल्या निर्णयावर फेरविचार याचिका (क्रिकेटमधील DRS) दाखल करू शकता पण त्यातून मिळणारे समाधान तात्पुरतेच असते.
सुहास पाटील
०२/०८/२०२२

No comments:
Post a Comment