आपण कोणत्या पदावर आहोत आणि काय बोलतोय याचे भान राखता येत नसेल तर सततच्या व्रात्यपणामुळे आपण त्या पदाचेच अवमूल्यन करीत नाही ना ? याचे आत्म परिक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे...धर्मराजाची बाजू आहे म्हणून प्रत्येक गोष्ट समर्थनीयच असेल असे नाही. सम्राट आहे म्हणून त्याला आज्ञा न देता शांत बसण्याने पितामहा भीष्मासमोरच एका अभिषिक्त राणीची विटंबना होण्याचा आणि सर्वनाशाच्या आरंभाचा उत्कलनबिंदू गाठला जातो. चांगले बोलता येत नसेल तर निदान वाईट घडेल, वाटेल असे बोलू तरी नये अशी सर्व सामान्यांच्या धारणेला तुम्ही धक्का दिलेला आहे... कोणतीही सारवासारव न करता आणि वस्तुस्थिती आहे असे सांगून समर्थन न करता बिनशर्थ माफी मागितली तर उरलासुरला आदर जिवंत राहील.... अन्यथा सर्व शक्तीशाली झाल्याच्या भ्रमात गेलेल्या कित्येकांच्या पतनाच्या कहाण्या आम्हीही ऐकून आहोत, काही दिवसापूर्वीच पाहूनही आहोत....
सुहास पाटील
३०/०७/२०२२

No comments:
Post a Comment